करोनाची दुसरी लाट थोडी फार ओसरल्यानंतर अक्षय कुमारने त्याच्या “रक्षाबंधन’चे शूटिंग मुंबईतच पूर्ण केले. दिल्लीमध्ये शूटिंग करता येत नसल्यामुळे दिल्लीतील चांदनी चौकाचा सेट चक्क मुंबईतच उभा केला गेला होता.
View this post on Instagram
या सेटवरच सिनेमातील काही भागाचे शूटिंग केले आहे. शेड्युल पूर्ण झाल्यावर अक्षय थोडा भावुक झाला होता. कारण ज्या चांदनी चौकाच्या कृत्रिम सेटवर त्याने हे शूटिंग केले होते, त्याच चांदनी चौकातल्या गल्ली बोळात त्याचे लहानपण गेले आहे.
View this post on Instagram
अक्षयने दोन फोटो शेअर केले आहेत. एकात तो दिग्दर्शक आनंद एल राय यांच्याबरोबर गप्पागोष्टी करतो आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये अक्षय स्कुटी चालवतो आहे. त्याच्या पाठीमागे आनंद एल राय आणि भूमी पेडणेकर दाटीवाटीने बसले आहेत.
View this post on Instagram
“चांदनी चौकाच्या गल्लीबोळातून अशाप्रकारे हिंडण्याची मजा काही औरच होती,’ असे तो म्हणाला. या चांदनी चौकाचा सेट इतका बेमालूम खऱ्यासारखा होता की आपण खऱ्या चांदनी चौकातच हिंडतो आहोत, असे वाटत होते, असेही अक्षयने म्हटले आहे.