नवी दिल्ली – मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या दरम्यानच्या प्रवासासाठीच्या नवीन आठ हवाई मार्गांना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी हिरवा झेंडा दाखवला.
मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात येथील लोकांचे नवीन विमान उड्डाणांचा लाभ झाल्याबद्दल मी अभिनंदन करतो, असे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया या वेळी म्हणाले.
याशिवाय 18 जुलै पासून दिल्ली-जबलपूर या मार्गावर अजून विमानउड्डाणे सुरू होतील, तसेच खजुराहो-दिल्ली-खजुराहो या मार्गावरही ऑक्टोबर 2021 पासून आणखी विमानउड्डाणे सुरू होतील असे त्यांनी सांगितले.
देशांतर्गत प्रदेश हवाई मार्गाने जोडण्यास प्राधान्य देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि “उडेगा देश का आम आदमी’ म्हणजेच णऊ हा पंतप्रधानांचा दृष्टिकोण नवीन उंचीवर नेऊ, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या सर्व आठ नवीन मार्गांवर एमएस स्पाईसजेटतर्फे विमानउड्डाणे सुरू होतील. ग्वाल्हेर-मुंबई-ग्वाल्हेर, ग्वाल्हेर-पुणे-ग्वाल्हेर,जबलपूर-सुरत-जबलपुरआणि अहमदाबाद-ग्वाल्हेर-अहमदाबाद असे हे आठ मार्ग आहेत.
उडान या योजनेतील मार्गामधील ग्वाल्हेर हा मध्य प्रदेशातील पहिल्या हवाईतळापैकी एक आहे, आणि अधिकच्या विभागीय हवाई मार्गांमुळे वाढीला लागणाऱ्या हवाई वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता आणि जम्मू या शहरांशी ग्वाल्हेर उडानयोजनांतर्गत हवाईमार्गाने जोडलेले आहे तसेच ते नियमित हवाईमार्गाने मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या शहरांशीही जोडले गेलेले आहे.
देशातील टीयर-2 आणि टीयर-3 दर्जांच्या शहरांची महानगरांसोबतची कनेक्टिविटी वाढवण्याचे केंद्रीय नागरी हवाई मंत्रालयाचे उद्दिष्ट या हवाई मार्गांमुळे साध्य होईल. या उद्घाटनानंतर मध्य प्रदेशातील जबलपूर हवाईतळ, बेंगलोर हैदराबाद आणि पुणे या नियमित हवाई मार्गे आणि बिलासपुर योजनेंतर्गत मार्गाने जोडला जाईल. जबलपूर हे मध्यप्रदेशचे प्रशासकीय आणि शैक्षणिक केंद्र आहे.