मुंबई – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटने धुमाकूळ घातला आहे. दररोज लाखोंच्या संख्येने रुग्ण सापडत असून आरोग्यव्यवस्था कमी पडत आहे. ऑक्सिजन, रेमडीसिव्हीरसह अनेक औषधांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. मोदींच्या या संवादावर काँग्रसने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
कोरोनाबाबत केंद्राने नेमकी काय उपाययोजना केली, पत्रकार परिषद कधी घेणार, असा थेट सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमात आरोग्य तज्ज्ञ, लॅबमधील तंत्रज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. यावरून काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. अशोक चव्हाण यांनी ट्विट करत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.
कोरोनाबाबत लोकांनी वेळीच नेमकी काय उपाययोजना करावी, यावर #MannKiBaat मध्ये डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्ब्युलन्स चालक आणि रूग्णांशीही प्रश्नोत्तरे झाली.
स्वागत आहे.पण् कोरोनाबाबत केंद्राने वेळीच नेमकी काय उपाययोजना केली, यावर पत्रकार परिषद कधी घेणार? देशाला उत्तरे कधी मिळणार?
— Ashok Chavan (@AshokChavanINC) April 25, 2021
मंत्री चव्हाण म्हणाले की, करोनाबाबत लोकांनी वेळीच नेमकी काय उपाययोजना करावी, यावर ‘मन की बात’मध्ये डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्ब्युलन्स चालक आणि रूग्णांशीही प्रश्नोत्तरे झाली. स्वागत आहे. पण, कोरोनाबाबत केंद्राने वेळीच नेमकी काय उपाययोजना केली, यावर पत्रकार परिषद कधी घेणार? देशाला उत्तरे कधी मिळणार?, असे प्रश्न अशोक चव्हाण यांनी ट्विटरवरून उपस्थित केलं आहेत.