मुंबई – आश्रमशाळांसाठी 600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 127 बांधकाम सुरू करण्यात आली असून, उर्वरित कामांना लवकरच मंजुरी देवून अपूर्णावस्थेतील आश्रमशाळा व वसतीगृहांचे काम प्राधान्याने पूर्ण करणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाची मंत्री विजयकुमार गावित यांनी विधानसभेत दिली.
मंत्री गावित म्हणाले, शबरी घरकुलासाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1 लाख 42 हजार रुपयांची तर महानगर प्रदेशात 17 हजार 280 तर डोंगराळ व नक्षलवादी भागात 18 हजार 240 रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा रूग्णालयात मेडिकल कॅम्प देण्यात येतील. केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत आदर्श योजना नाशिक जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून यासाठी 60 टक्के अनुदान केंद्र सरकार तर 40 टक्के राज्य शासन देईल.
वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी स्वयंम योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येईल. 11/12 वी च्या तुकड्या वाढविण्यात येतील. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील २७ पाड्यांसंदर्भातील समस्या विविध विभागाशी समन्वय साधून सोडविण्यात येईल, असेही मंत्री गावित यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हरिभाऊ बागडे, वर्षा गायकवाड, रवींद्र वायकर, संजय केळकर, सदस्य सुनिल प्रभू, हसन मुश्रीफ, आदित्य ठाकरे, आशिष जैस्वाल, चंद्रकांत नवघरे, संग्राम थोपटे, राहुल कुल, किशोर जोरगेवार, प्रकाश सोळंके, प्रशांत बंब, विनोद अग्रवाल, आदिती तटकरे, यशवंत माने, रईस शेख, भगवंतराव वानखेडे, विनोद त्रिकोले आदी सदस्यांनी सहभाग घेतला.