पारगाव, (वार्ताहर)- शासनाने गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे किंवा पाऊस कमी झाल्याने ठिकाणी ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान होऊन दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. त्या शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान योजनेचे अर्ज (दि.३१) मार्चपर्यंत मागविण्यात आले होते. दि. ३१ मार्चपर्यंत नोंदणी केलेल्या अनुदास पात्र शेतकऱ्यांची यादी ही मंजूर झाली आहे. परंतु पारगावमधील जवळपास २५०० शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
दौंड तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येच्या पारगावमध्ये ३३०० चे आसपास खातेदार (शेतकरी) आहेत. त्यापैकी ८०० ते ८५० शेतकऱ्यांनाच हे अनुदान मिळणार असल्याने जवळपास २५०० शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी शासनाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
योजनाबाबत अनेक शेतकऱ्यांना कल्पनाच नव्हती मुदत संपल्या नंतर अनेक जणांना हि योजना माहिती पडली. प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ झाला पाहिजे.- संभाजी ताकवणे, संचालक, पारगाव सोसायटी.
उर्वरित शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावेत. शेवटच्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना चालू राहणार आहे. – अरुण शेलार, तहसीलदार, दौंड.
दौंड तहसीलदार यांच्याकडून उर्वरित शेतकरी बांधवांचे अर्ज भरून घेण्याचा आदेश प्राप्त झाला असून अर्ज भरून घेण्याचे काम चालू केले आहे. – अजित फराटे, कृषी सहायक