संभल : सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या (का) विरोधात झालेल्या हिंसाचारातील नुकसानीबद्दल संभल जिल्हा प्रशासनाने 26 जणांना नोटीस बजावली आहे. निदर्शकांपैकी अटक केलेल्या 150 जणांना सोडण्यात आले असून 55 जणांचा सहभाग हिंसाचारात असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी 48 जणांना गजाआड करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी कमलेश अवस्थी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्दया माहितीनुसार, का विरोधातील निदर्शनानंतर झालेल्या हिंसाचारात सहभागी असललेल्या 26 जणांना नुकसान भरपाईची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडे 14 लाख 86 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
हिंसाचार करणाऱ्या कोणाचाही मुलाहीजा ठेवला जाणार नाही. त्यांच्या जमीनी आणि मालमत्ता विकून नुकसानीची भरपाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी काही दिवसांपुर्वी दिला होता.