बार्शीतील घटनेने सोलापूर जिल्ह्यात खळबळ
सोलापूर : शहरातील अलिपूर येथे एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून ज्ञानेश्वर मठ येथील कोकाटे कुटुंबीयांत ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आपल्या मुलांना विष पाजून आई-वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात येत आहे.
शहरातील अलिपूर रोड परिसरातील ज्ञानेश्वर मठ जवळील भैरवनाथ शिवाजी कोकाटे यांनी आपल्या कुटुंबासमवेत आत्महत्या केली. भैरवनाथ शिवाजी कोकाटे (40), मनिषा भैरवनाथ कोकाटे (36), प्रशांत कोकाटे (15), आणि प्रतिक्षा कोकाटे (11) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.