लोकसभा निवडणुकीतील पहिल्या ६ टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडले. यावेळी ७६ कोटी ४१ लाख मतदार पात्र होते. त्यांच्यापैकी ५० कोटी ७२ लाख मतदारांनी हक्क बजावला. अशात अनेक मतदान केंद्रावर इव्हीम मशीन बंद पडल्याचे समोर आले तर कुठे गोधळ उडाल्याचे घटना समोर आली.
याच दरम्यान, पश्चिम बंगाल मधील भाजप पक्षाच्या उमेदवाराला मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. झारग्राममधील भाजपच्या लोकसभा उमेदवाराचा मंगलापोटा भागातील आंदोलकांनी पाठलाग केला. शनिवारी सहाव्या टप्प्यातील मतदानादरम्यान त्यांच्यावर आणि त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली.
सुरक्षा कर्मचारी उमेदवार प्रणत तुडूला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. कारण काही लोक त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर दगड फेकताना दिसत आहे. यानंतर उमेदवार, सुरक्षा अधिकारी आणि काही मीडिया कर्मचारी पळताना दिसत आहे.
तुडू यांनी या घटनेसाठी “तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे. त्यांनी दावा केला की त्यांच्या दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
ट्विटरवरील एका पोस्टमध्ये, भाजपचे बंगालचे सह-प्रभारी अमित मालवीय यांनी देखील या हल्ल्यासाठी टीएमसीला जबाबदार धरले आणि दावा केला की लोक मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला “हाकलून” देण्यासाठी मतदान करत आहेत.
उमेदवार प्रणत तुडू यांनी सांगितले, पक्षाच्या एजंटांना आत प्रवेश दिला जात नसल्याचा अहवाल मिळाल्यानंतर मी गारपेटा येथील काही मतदान केंद्रांना भेट देत होतो. यावेळी अचानक, टीएमसीच्या गुंडांनी माझ्या कारवर विटा फेकण्यास सुरुवात केली. माझ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते जखमी झाले. माझ्यासोबत असलेले दोघे यांना गंभीर दुखापत झाली आहे. तर यावर तुडूच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेवर हल्ला केल्याचा दावा टीएमसीने केला आहे.