मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ‘सुषमा अंधारे’ हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. शिवसेनेच्या नेत्या म्हणून त्यांनी आपल्या वकृत्वातून राजकीय नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. त्यांच्या भाषणांना मुळे शिवसेनेला एका नवीन चेहरा मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जाता आहे. दरम्यान, आपल्या व्यक्तव्यामुळे सतत चर्चेत असणाऱ्या सुषमा अंधारेंनी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नुकतंच, सातारा जिल्ह्यातील पाटण मतदार संघात महाप्रबोधन यात्रेदरम्यान आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी शंभूराज देसाई यांच्यावर टीकास्त्र सोडले. सुषमा अंधारे म्हणाल्या, “तुमचे आजोबा शब्दाचे पक्के होते. त्यांनी कायम स्वतःचा स्वाभिमान अबाधित ठेवला. स्वतःचे मूल्याधिष्ठित राजकारण डागाळणार नाही, याची काळजी घेतली.
मात्र, तुम्ही तुमच्या आजोबांच्या विचारांचे तरी झालात का? असा सवाल उपस्थित करून तुम्ही तुमच्या आजोबांच्या नावाला कलंक लावला आहे’. अशी जहरी टीका सुषमा अंधारे यांनी केली. तसेच, यावेळी त्यांनी आपल्या रोखठोक शैलीत राज्यातील बंडखोर आमदार आणि केंद्र सरकाराचा देखील समाचार घेतल्याचे दिसून आलं आहे.