Lok Sabha Election 2024 । देशाला स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्षे उलटली आणि या सत्तर वर्षांनंतर 2024 मधील निवडणुकांसाठी या देशाचे संविधान बदलण्याचे कारस्थान सुरू आहे. अशी टीका लोकसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान विरोधकांकडून होत आहे. यावर आज उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिउत्तर दिल आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
‘सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे की, संविधानाच बेसिक स्ट्रक्चर बदलण्याचा अधिकार संसदेला नाही. हा काँग्रेसचा जुमला आहे. काँग्रेसला विकासाचा विचार मांडता येत नाही.
ते पुढे म्हणाले, ज्यावेळी कुठलही जनहिताच कार्य करता येत नाही. विश्वासहर्ता संपलेली असते. अशावेळी लोकांच्या मनात कनफ्युजन निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. 2014, 2019 आणि आता 2024 मध्येही काँग्रेसचा तोच प्रयत्न आहे. पण लोकांचा विश्वास मोदींवर आहे. तीन राज्यात मोदींच्या बाजून कौल दिला. आता सुद्धा जनता मोदींच्या बाजूने मतदान करेल’ असं म्हणत फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपावर प्रतिउत्तर दिले आहे.
हे वाचले का ? जगातील सर्वात वयोवृद्ध गोरिल्लाने साजरा केला 67 वा वाढदिवस, एकट्याने खाल्ला केक, व्हिडिओ पाहाच