करोना नावाच्या महाभयंकर विषाणूने आज संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. सर्वत्र हाहा:कार उडाला आहे. सरकारद्वारे प्रकाशित होणाऱ्या रोजच्या आकडेवारीवरुन आपल्या हे निश्चितपणे लक्षात येत आहे. भारत सरकराने याविषयी प्रथमपासूनच अत्यंत गंभीरतेने निर्णय घेत संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये ठेवला. या क्रांतीकारी निर्णयामुळे आपण आज सुरक्षित आहोत. लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेला नसता, तर आज काय परिस्थिती असती, याच विचारही न केलेलाच बरा. या निर्णयासाठी खरच सरकारला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत.
अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी खास करुन आरोग्य कर्मचारी, महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, वार्तांकन करणारे पत्रकार मित्र, वर्तमानपत्र घरोघरी पोचविणारी यंत्रणा या सर्वांनीच आपला जीव धोक्यात घालूून सेवा दिली. त्या सर्वांना मानाचा मुजरा. केंद्र व राज्य सरकार या परिस्थितीत अतिशय चांगले काम करत आहेत. योग्य ते निर्णय घेऊन आपण कसे सुरक्षित राहू, यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. त्याअन्वये प्रशासन वरिल सर्व निर्णयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. जनताही त्यांना योग्य रितीने साथ देत आहे. आज हातावर पोट असणारे कामगार छोटे व्यवसायी, शेतकरी खूपच अडचणीत आले आहेत. त्यांनाही योग्य प्रकारे मदत करावी लागेल.
संतोष यादव , विभागीय सचिव, नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्ट एम्प्लॉईन, नगर. संपर्क : 9822957815
करोनाच्या महामारीचा सर्वांनीच धसका घेतला. त्यातही करोनाचा अत्यंत चांगल्या पद्धतीने सामना करणाऱ्या नगरची ओळख थोडी वेगळीच. येथील खराब रस्ते, खड्डे, गटारी, अतिक्रमण, मोठे खेड, अशी ओळख आपणच करुन देतो. मात्र, करोनाच्या बाबतीत विचार केल्यास नगरचे नाव खूप उंचावले आहे. नगरची “ऑरेंज सिटी’ झोनकडून ग्रीन सिटी झोनकडे वाटचाल सुरू आहे. त्याचे श्रेय नागरीकांनाच द्यावे लागेल. पोलिस यंत्रणेनेही सहकार्य केले आहे.
दानविरांनी पुढे येऊन सढळ हाताने मदत दिली. ऍड. धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या साई द्वारका ट्रस्टसारख्या अनेक स्वयंसेवी संस्थांनी कुठलीही अभिलाषा न ठेवता गोरगरीब व लॉडडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी अतोनात प्रयत्न करुन सेवा दिली. त्या सर्वांचे कुठल्या शब्दांत आभार मानावेत, हेच कळत नाही. करोनावर मात करणे हे आपल्याच हातात आहे. सेल्फ डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर व्यतिरिक्त अजुनही काही सुरक्षा नियम आहेत. ते नक्कीच पाळावेत. नोटा हातात न घेता पिशवीत घ्याव्यात, बाहेर वापरात येणारी चप्पल घरात आणू नये. कोणत्याही वाहनाच्या टायरला हात लावू नये. फळे-भाज्या धूवूनच घ्याव्यात, इतर गावचे खाद्य पॅकिंग सहसा घेऊच नयेत, आदी नियम पाळणेही महत्वाचे आहे.
राहूल मुथ्था , आआयएफएल सिक्युरिटीज, नगर, संपर्क : 9545567088