पुणे – महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी काँग्रेसला टोला लगावला होता. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँगेसने मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे. आता राज्यतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील स्वबळावर लढविली जाणार आहे. काँग्रेसने तशी तयारी सुरु केल्याचे पटोले यांनी म्हटले.
शिवसेना पक्षप्रमुख शनिवारी मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर पक्षप्रमुख म्हणून बोलत होते. मात्र काँग्रेस पाच वर्षे उद्धव ठाकरे यांच्यासोबत ताकदीने उभी आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी तशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून सरकारला प्रॉब्लेम होणार नसल्याचे नाना पटोले म्हटले.
काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तशी तयारी सुरू झाली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल, असंही नाना पटोले यांनी म्हटलं.