मुंबई – आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवले जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवले जाते, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आंबेडकरांनी “एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हणत भाजप आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली आहे.
भाजप – आरएसएसच्या राजकारणाचा प्रभाव वाढल्यापासून सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत.
We are not only treated as untouchable in society but untouchable in politics as well.
With the advent of BJP-RSS, both the Congress and NCP — the propagators and believers of the orthodox Sanathan Dharm — have started practicing untouchability in politics.
If an invitation was… pic.twitter.com/WiZWCoTNhg
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 8, 2023
आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात का आले नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना केला होता, यावर बोलताना आंबेडकरांना बैठकीचे निमंत्रण द्यायला ही काय सत्यनारायणाची पूजा आहे काय? असा सवाल करून वडेट्टीवारांनी डिवचले आहे या अनुशंगाने बोलताना आंबेडकर म्हणाले की “इंडिया आघाडीमध्ये येण्यासाठी निमंत्रणाची गरज नव्हती, तर इतर पक्षांना निमंत्रणे का वाटत फिरत होतात?’ असा थेट सवाल त्यांनी कॉंग्रेसला विचारला आहे.
लालू प्रसाद यादव आणि स्टॅलिन या शूद्रांमधल्या मोठ्या समाजवादी नेत्यांशिवाय तुमच्या आघाडीची गाडी अडली नसती, तर त्यांना तुम्ही निमंत्रण दिले असते का याबद्दल मला शंकाच आहे, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी कॉंग्रेसच्या हेतूंवरच प्रश्न उपस्थित केला आहे.