मुंबई- अनेकदा आपल्याला कामाचा प्रचंड तणाव असतो. त्यातून वेळ मिळत नसल्याने आपली अनेक कामे रखडलेली किंवा पुढे ढकललेली असतात. मात्र आपल्याला ती कामे पुर्ण करायचे असतात. थोडा वेळ स्वत:साठीसुद्धा राखायचा असतो. अशावेळी द्विधामनस्थितीत न जाता. ज्या गोष्टी आपल्याला पटेल किंवा आवडतात त्या गोष्टी करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र एवढंकरुनही मन रिलॅक्स होत नाही. तर मग खालील उपाय नक्की करुन बघा…
…या उपायाचे दोन फायदे आहेत
*मन शांत होईल (रिलॅक्स वाटेल)
*आपली रखडलेली कामे पु्र्ण होतील.
- तुम्ही लिहीलेली जुणी डायरी वाचा किंवा जुने फोटो बघा.
- तुमच्या आवडीचे कपडे नीट ठेवा, कपाट आवरा.
- आवडतं पुस्तक वाचा. त्याचबरोबर आधिक वाचणं व्हावं यासाठी नवनवीन पुस्तकांची खरेदी करा.
- आपला डेस्क आवरायला घ्या. जेणेकरुन तुम्ही आधी केलेल्या कामांवर हात फेरला जाईल.
- दिवसभर शांत रहा.
- आवडीचे किंवा नवनवीन पदार्थ करुन बघा.
- आयुष्यात आलेल्या चांंगल्या प्रसंगाची यादी करा.