औरंगाबाद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बहुप्रतिक्षीत सभा आज सुरू झाली. उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार याची उत्सुकता होती. उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच विरोधकांवर टीका करत आपण राजकीय भाष्य करणार नसल्याचं म्हटलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी टीव्हीवर पाहात होतो की, उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, त्यांच्या निशाण्यावर कोण असणार अशा बातम्या सुरू होत्या. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ढेकणं चिरडण्यासाठी तोफांची गरज नसते, म्हणत विरोधकांना टोला लगावला.
उद्धव ठाकरे पुढं म्हणाले की, हे मला विचारतात, औरंगाबादचं संभाजीनगर कधी करणार ? हे मला काय विचारतात. विमानतळाला छत्रपती संभाजी राजे यांचं नाव देण्याची मागणी केली. त्यावर हे काहीच बोलणार नाही. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणार हे वचन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं आहे. त्याआधी मी औरंगाबाद शहराचा विकास करणार आहे. शहरात पाणी नाही, रस्त्यावर खड्डे असतील संभाजीराजे मला टकमकटोक दाखवतील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.