Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची झोप उडणारं; आता आमदारही फुटणार? केंद्रीय मंत्र्याच्या विधानाने खळबळ
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षांतरांच्या घडामोडींना वेग आला आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षांतरांच्या घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या एका वक्तव्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
आता आमदारही फुटतील : रामदास आठवले
कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याकडे आता आंदोलन करण्याशिवाय दुसरे काही काम उरलेले नाही. खासदार गेले आहेत, आता आमदारही फुटतील. लोकप्रतिनिधींना पक्षात टिकवून ठेवण्याची ताकद त्यांच्यात राहिलेली नाही. (Maharashtra Politics)
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, या घडामोडींसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जबाबदार धरणे योग्य नाही. “हे ऑपरेशन देवेंद्र नाही, तर ऑपरेशन टायगर आहे. शिवसैनिकांना एकनाथ शिंदे हेच खरे शिवसेना नेते वाटत असल्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे जात आहेत,” असा दावा त्यांनी केला. (Maharashtra Politics)
उद्धव ठाकरेंना एनडीएमध्ये येण्याचं आवाहन
रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांनाही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला. इतके आमदार-खासदार आमच्याकडे येत आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही आमच्यासोबत यावे, असे ते म्हणाले. (Maharashtra Politics)
राज ठाकरेंवरही टीका
यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. राज ठाकरे हे भूमिका बदलणारे नेते आहेत. त्यांना आमदार निवडून आणता येत नाही, त्यामुळे ते इतर पक्षांवर आरोप करतात. जे आमदार आमच्याकडे येतात, त्यांना आम्ही स्वीकारतो, अशी टीका आठवले यांनी केली. (Maharashtra Politics)
सध्या या विधानांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, आगामी काळात ठाकरे गटातील आणखी काही लोकप्रतिनिधी पक्षांतर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
Uddhav Thackeray : राम मंदिर दान घोटाळ्यावर उबाठा गट आक्रमक! उद्धव ठाकरेंकडून मोठी घोषणा






