Toll Tax Hike Cancelled : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने सोमवार, 1 एप्रिलपासून देशभरातील राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर टोल टॅक्स वाढवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये हा खुलासा झाला आहे.
देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे टोल शुल्क वाढीचा निर्णय लांबणीवर पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टोल टॅक्समध्ये कोणताही बदल नाही –
NHAI च्या टोल दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र रविवारी रात्री 9 च्या सुमारास NHAI च्या प्रकल्प व्यवस्थापक (बरेली) यांनी एक पत्र देखील जारी केले आहे, की पुढील आदेश येईपर्यंत टोलचे दर बदलले जाणार नाहीत.
आग्रा आणि उत्तर प्रदेशातील इतर भागात तैनात असलेल्या NHAI अधिकाऱ्यांनी देखील पुष्टी केली आहे, की सध्या टोल दरांमध्ये कोणताही बदल होणार नाही.
फास्टॅग केवायसी आवश्यक –
अलीकडील निर्देशांनुसार, ज्या फास्टॅग वापरकर्त्यांनी त्यांचे केवायसी तपशील अपडेट केले नाहीत त्यांचे फास्टॅग खाते आणि डिव्हाइस आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून अवैध घोषित केले जातील. फास्टॅग केवायसी सर्व फास्टॅग वापरकर्त्यांसाठी अनिवार्य आहे. तुम्ही अजून KYC केले नसेल, तर फास्टॅग तुमच्या बँक खात्यातून निष्क्रिय केले जाईल.