नवीदिल्ली – सकाळी चहा पिण्याची सवय आयुष्यावर बेतू शकते असं कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु चहा प्यायल्याने एकाच कुटुंबातील तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये हा विचित्र प्रकार घडला आहे. एका कुटूंबातील तीन सदस्यांनी सकाळी नेहमीप्रमाणे उठून चहा प्यायला आणि त्यांना उलट्यांचा त्रास सुरु झाला.
Mainpuri, UP | 3 people incl 2 children dead, two seriously ill after consuming poisonous tea at their residence in Kanhai village
Prima facie probe reveals that the woman while preparing tea put insecticide used in paddy fields instead of tea leaves. Forensic team present: SP pic.twitter.com/m6s2Wl2giM
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 27, 2022
उलट्यांचा त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये २ लहान मुली आणि आणखी एका जणाचा समावेश आहे. तपासामध्ये चहा करताना घरातील महिलेने गवती चहा ऐवजी दुसऱ्या वनस्पतीची पाने तोडून आणून चहामध्ये टाकल्याने हा सर्व प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे.
नेमकं काय घडलं
घरातील सुनेने चहा करण्यासाठी शेतातून गवती चहा समजून काही पाने तोडून आणली आणि चहामध्ये टाकली. चुकून तोडून आणलेली ही पाने विषारी निघाली. तपासमध्येही ही पाने विषारी असलयाचे उघडकीस आले. गुरुवारी घडलेल्या या विचित्र प्रकारामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला तर आणखी दोघांची प्रकृती गंभीर आहे. उत्तर प्रदेशमधील मैनीपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.
#मैनपुरी के थाना औंछा क्षेत्र के ग्राम कन्हई में चाय पीने से एक व्यक्ति व 02 बच्चों की मृत्यु होने के संबंध में अपर पुलिस अधीक्षक मैनपुरी द्वारा दी गई बाईट।#UPPolice pic.twitter.com/w5VE82fGmb
— MAINPURI POLICE (@mainpuripolice) October 27, 2022
पोलिसांनी घडनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि पुढील तपासासाठी चहा बनवलेले भांडे तसेच इतर गोष्टी फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आल्या आहेत. प्रकृती चिंताजनक असलेल्या इतर दोन सदस्यांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.