मुंबई – शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संताप पसरला आहे. या प्रकरणी रविवारी रात्री उशीरा शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात आरोप करत तक्रार दाखल केली आहे. आपला हा खोटा व्हिडीओ ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनीच व्हायरल केल्याचा थेट आरोप त्यांनी केला असून, सध्या शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात चांगलाच वाद चालू झाला आहे.
दरम्यान, अश्यातच आता या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एन्ट्री घेतली आहे. महिला आयोगाने धाडसी निर्णय घेत आता या प्रकरणातील सत्यता तपासून त्याची चौकशी करण्याची मागणी गृह विभागाकडे करण्यात आली आहे. या संदर्भातील ट्विट देखील रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्यामुळे आता हे प्रकरण गृह विभागाकडे गेल्याने यातून नेमकं काय बाहेर पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
श्रीमती शीतल म्हात्रे यांच्याबाबतीतचा व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला जात आहे.ह्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.१/२@CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @Maha_MahilaAyog @DGPMaharashtra @MahaCyber1
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 13, 2023
आपल्या ट्विटमध्ये रुपाली चाकणकर म्हणतात की…, “शीतल म्हात्रे यांच्याबाबतीतचा व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला जात आहे. ह्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. राज्यातील महिला लोकप्रतिनिधींना माध्यमांवरून ट्रोल करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत, लोकप्रतिनिधींबाबत जर असे प्रकार होत असतील तर समस्त महिला वर्ग राज्यात सुरक्षित आहेत का? हा प्रश्न आहे.
राज्यातील महिला लोकप्रतिनिधींना माध्यमांवरून ट्रोल करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत, लोकप्रतिनिधींबाबत जर असे प्रकार होत असतील तर समस्त महिला वर्ग राज्यात सुरक्षित आहेत का हा प्रश्न आहे.महिलांना सायबर सुरक्षा प्रदान करणे हे ही तितकेच महत्वाचे आहे.२/३
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 13, 2023
महिलांना सायबर सुरक्षा प्रदान करणे हे ही तितकेच महत्वाचे आहे अशा प्रकरणांमध्ये सायबर गुन्हे विभागाने गांभीर्याने आणि तातडीने कारवाई केल्यास त्याला वेळीच पायबंद होईल. म्हात्रे ह्यांच्या व्हिडिओ प्रकरणी गृह विभागाने योग्य ती कारवाई तात्काळ करावी व यामागील नेमके सत्य समक्ष आणावे…’ या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.