चेन्नई : तुम्ही जगभरात कोठेही रहा पण आपले काम, संशोधनाने अन्य भारतीयांना काय लाभ होईल हे कायम ध्यानात ठेवा, असे आवाहन पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी केले. आयआयटी मद्रासच्या 56 व्या पदवीदान सोहोळ्यात पंतप्रधान बोलत होते.
ते म्हणाले, ही केवळ तुमची सामाजिक जबाबदारी नाही तर त्यातून तुमची व्यावसाईक दृष्ट तियार होईल. आपण पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे जात आहोत. त्या स्वप्नासाठी तुमच्या तंत्रज्ञानाचे इंधन असणार आहे.
जगभरातील भारतीयांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यात आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा वाटा मोठा आहे. तुम्ह जगभरात बॅंड इंडिता तयार केला आहे. आयआयटी पदवीधर हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही आपली छाप पाडतात, असेही मोदी म्हणाले.