नवी दिल्ली – आगामी काळात होणार टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात नव्हे तर युएई अर्थात संयुक्त अरब अमिरात येते होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याची पुष्टी केली आहे. आधी या स्पर्धेचे आयोजन भारतात होणार होते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी म्हटलं की, टी-२० विश्वचषक युएईमध्ये स्थलांतरित कऱण्याचे आंतराष्ट्रीय किकेट कौन्सिलला सांगण्यात येईल.
देशात करोना संसर्गाची चिंताजनक स्थिती पाहता, टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भारताऐवजी संयुक्त अरब अमिरात येथे घेण्याचं नियोजित केलं आहे. आयसीसीला देखील स्पर्धेच्या स्थलांतराविषयी सूचित केल्याचे गांगुलीने म्हटले आहे.
क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच युएईमध्ये टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कऱण्यात येणार आहे. तर आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने देखील युएईमध्येच होणार असल्याचे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे. सामन्याचं वेळापत्रक आयसीसी निश्चित कऱणार आहे.
The venue for ICC Men’s T20 World Cup 2021 has been shifted to the UAE and Oman, with the tournament set to run from 17ht October to 14th November. BCCI will remain the hosts of the event: International Cricket Council (ICC) pic.twitter.com/KbIPBJLEwq
— ANI (@ANI) June 29, 2021
भारतात सध्या करोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र बीसीसीआय कोणतीही जोखीम घेण्यास तयार नाही. त्यामुळे स्पर्धेचे आयोजन युएईमध्ये कऱण्यात येत आहे.