पिंपरी, (प्रतिनिधी) – इंदिरा गांधी पुलावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येताना गोकूळ हॉटेल समोर मागील काही दिवसांपूवी खड्डा खोदला आहे. हा खड्डा खोदताना निघालेला राडारोडा तसाच पदपथावर पडून आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना प्रवास करताना अडथळ्याचा सामना करावा लागत आहे. येथील खड्डा व्यवस्िथत बुजवून रस्ता रहदारीस मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
इंदिरा गांधी पुलावरून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुलाकडे प्रवास करणाऱ्या वाहनांची व नागरिकांची संख्या मोठी आहे. दिवसरात्र येथील रस्त्यावर रहदारी असते. परंतु येथील खड्ड्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निमार्ण झाला आहे.
येथे पदपथाजवळ अनधिकृतपणे वाहने लावली जात आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना अडथळ्यांची शयरत पार करावी लागत आहे. हा पदपथावरील रस्ता पिंपरी रेल्वे स्टेशनला जात असल्याने त्याठिकाणी सतत वर्दळ असते.
तरी पालिकेचे कर्मचारी या खड्ड्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या पदपथावरुन ये-जा करीत असताना लहान मुलांचा किवां ज्येष्ठ नागरिकांचा अपघात होण्याची शकता नाकारता येत नाही. तरी येथील खड्ड्याचे त्वरित काम करून पदपथ मोकळा करावा, अशी मागणी तेथील स्थनिक नागरिकांनी केली आहे.