नौदली प्रमुखांनी व्यक्त केला इरादा
पणजी – भारतीय नौदलाला तिसऱ्या विमानवाहू नोैकेची गरज आहे असे मत नौदल प्रमुख अडमिरल करमबीरसिंग यांनी व्यक्त केले आहे. भारतीय सागरी हद्दीत सध्या अनेक आव्हाने उभी आहेत त्याचा मुकाबला करण्यासाठी ही तिसरी विमान वाहू नौका गरजेची आहे असे त्यांनी म्हटले आहे. गोवा मारीटाईक कॉन्क्लेव्ह साठी नौदल प्रमुख गोव्यात आले होते.
त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या कॉनक्लेव्ह मध्ये भारतीय सागरी हद्दी लगत असलेल्या दहा देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. ते म्हणाले की भारतीय नौदलाच्या तिसऱ्या विमानवाहू नौकेच्या प्रस्तावावर सरकार विचार करीत आहे पण त्याची प्रक्रिया मात्र अद्याप सुरू झालेली नाही.
या कॉन्क्लेव्ह मध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचेही उद्या भाषण होणार आहे. ही परिषद शनिवारी संपणार आहे.