मुंबई – कोरोना लसीकरण मोहिमेतील केंद्राच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार सातत्याने समोर आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा आणि नवीन आरोग्यमंत्री नेमण्यामागे हेच कारण होते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनात प्रतिदिवस 15 लाख लसीकरण करण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे, असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला होता. मात्र केंद्राकडून लशी उपलब्ध झाल्यावरच हे शक्य होऊ शकेल, असे तपासे म्हणाले.
कोरोना लसीकरण मोहिमेतील केंद्राच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार सातत्याने समोर आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा आणि नवीन आरोग्यमंत्री नेमण्यामागे हेच कारण होते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते @maheshtapase यांनी केले आहे. pic.twitter.com/vh1axOlB6q
— NCP (@NCPspeaks) July 13, 2021
आज राज्यातील अनेक महापालिकांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून लससाठा उपलब्ध नाही. याला केवळ केंद्रातील भाजप सरकार जबाबदार आहे, असा आरोप तपासे यांनी केला.
राज्य सरकारने अधिवेशनादरम्यान केंद्राकडे दरमहा तीन कोटी लशींची मागणी करूनही लशी उपलब्ध होत नाहीत, ही खंत त्यांनी व्यक्त केली.