मुंबई – भारतीय महिला संघाकडे गुणवत्ता आहे मात्र, क्षेत्ररक्षणात कमालीची सुधारणा गरजेची आहे, असे मत भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रीक्स हीने व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताच्या महिला संघाला 3-0 असा दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यात अनेकदा क्षेत्ररक्षणातील चुकांमुळेच प्रतिस्पर्धी संघाला लाभ होत असल्याचे दिसून आले. त्यातच संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनीही याच गोष्टीवर बोट ठेवले होते.
पराभवानंतर जेमिमानेही हे कबुल केले. आमचे क्षेत्ररक्षण दर्जाला अनुरूप झाले नाही. त्यातच आम्ही फलंदाजीत यश मिळवल्यावर गोलंदाजीतची सरस कामगिरी करत होतो मात्र, त्यावेळी गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची जी साथ हवी होती ती मिळाली नाही. येत्या काळात नेटमध्ये सराव करताना क्षेत्ररक्षणातच मोठी सुधारणा करण्यावर भर द्यावा लागेल, असेही ती म्हणाली.