केरळ : दक्षिण तामिळनाडूसाठी “ताम्रपर्णी-कारूमेनी-नांपियारू नदी जोड योजना’ यावर्षी लागू केली जाईल, अशी घोषणा तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी केली.
समुद्राच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप रोखण्यासाठी 52 कोटी 46 लाख रुपयांची ही योजना अलनथराईमध्ये लागू केली जाईल आणि थुथुकुडी जिल्ह्यात 10 कोटी रुपयांची पेयजल योजना सुरु केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. थुथुकुडी जिल्ह्यात तिरुचेन्दूर जवळ वीरपांड्या पट्टिनममध्ये 1 कोटी 34 लाख रुपये खर्चून बांधलेल्या डॉ. सिवंती आदित्यन स्मारकाचेच्या उद्धाटन सोहळ्यात आज पलानीस्वामी बोलत होते.