असे म्हणतात की जर ध्येय निश्चित असेल आणि तुमची इच्छाशक्ती मजबूत असेल तर यश मिळवणे अवघड नसते. याचेच एक उदाहरण म्हणजे कन्नौज जिल्ह्याचे एआरटीओ इज्या तिवारी. आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेला धैर्याने सामोरे जात आणि आपल्या मेहनतीसह सर्व अडचणींना सामोरे जर आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारी इज्या तिवारी ही सर्वांसाठी एक आदर्श ठरली आहे. लहान वयातच वडिलांचा आधार गेला त्यामुळे आईला मोठा धक्का बसला. या मोठ्या संकटातून आईला आणि स्वतःला सावरत प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर इज्याने यश संपादन केले. त्यांची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया…
इज्या तिवारी या मूळच्या लखनौच्या रहिवासी असून, त्यांची जिल्ह्यात पहिल्यांदाच परिवहन विभागाची महिला अधिकारी म्हणजेच एआरटीओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यावेळी इज्या तिवारी ८वीत शिकत होती. वडिलांच्या आजारपणामुळे जमवून ठेवलेलेसर्व पैसे खर्च झाले, वडिलोपार्जित घरही गेले.आणि भाड्याच्या घरात राहावे लागले. त्यानंतर आजारपणामुळे वडील गेले. त्यानंतर आईची मनस्थिती ठीक नव्हती. घरात जेवणासाठीही पैसे नव्हते. त्यानंतर मुलांपेक्षाही पुढे जात एका मुलीने या कठीण काळात आईला आधार दिला. इज्या आपल्या आई-वडिलांची एकुलत्या एकच मुलगी आहेत.
पहिल्याच प्रयत्नात यश
इज्याने आपल्या आयुष्यातील संघर्षाविषयी सांगताना,”आयुष्याचे सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. वडील गेल्यानंतर सर्व काही बदलले आणि मला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. आमचे बरेच लोक आम्हाला सोडून गेले. पण मी हार मानली नाही. ब्राइट लाइन इंटर कॉलेजमध्ये शिक्षक असलेल्या माझ्या गुरूंनी माझ्याकडे पैसे नसतानाही मला मोफत शिक्षण दिले. मला लिहायला आणि वाचायला खूप आवडायचे आणि मी वाचनात चांगली होती. वयाच्या १२व्या वर्षी माझा संघर्ष सुरू झाला. खूप कष्ट करून बँकेत नोकरी लागली. यानंतरही मी माझा अभ्यास सुरू ठेवला. बँकेतून परतल्यावर मी रात्री तासनतास अभ्यास करायची. सुमारे ४ वर्षे खूप मेहनत घेतली. त्यानंतर उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगात पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले.
स्वतः अभ्यास केला आणि आईलाही साक्षर केले
दरम्यान, कॉलेजच्या दिवसात इज्याने तिच्या आईलाही पुढील शिक्षणासाठी प्रेरित केले. माझं ग्रॅज्युएशन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर आई पूर्णपणे गळून गेली होती. तिने अनेक संकटांना तोंड देत आईची काळजी घेतली. मुलीऐवजी आई बनून आईची सेवा केली. 2014 मध्ये बँकेत नोकरी मिळाल्यानंतरही आईची काळजी घेत इज्याने 10 ते 5 नोकरी केल्यानंतर रात्री 9 ते 2-3 वाजेपर्यंत मेहनत आणि परिश्रमपूर्वक अभ्यास करून UPPCS ची तयारी सुरू केली. इज्याने तिच्या तयारीदरम्यान कोणताही क्लास लावला नाही. तिने आपला अभ्यास ऑनलाइन आणि इतर स्त्रोतांकडून सुरू ठेवला. त्यामुळे ४ वर्षांपासून मेहनत घेऊन इज्या तिवारीला 2018 च्या बॅचमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले.
तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संदेश
इज्या तिवारी यांनी आपल्या यशाविषयी सांगताना, उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना वेळेची विशेष काळजी घ्यावी, अभ्यास करताना मी स्वतःला थोडे वेगळे केले. अशा परिस्थितीत, जीवनातील चढ-उतार असतानाही मी माझा अभ्यास बाजूला ठेवला. कामासोबतच मी सतत ५ ते ६ तास मन लावून अभ्यास केला. विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत निराश होण्याची गरज नाही. जर तुम्ही पूर्ण समर्पण आणि मनापासून तयारी करत असाल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल.