मुंबई: एसटी कामगारांच्या संपामुळे राज्यातील प्रवाशांचे हाल सुरु आहेत. प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. संपाच्या कालावधीत प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शासनाने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली. त्याचवेळी संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास महामंडळाने सुरुवात केली आहे.
एसटी कामगारांच्या संपावर अद्यापही समाधानकारक तोडगा निघाला नसल्याने सरकारने खासगी वाहनांमधून प्रवासी वाहतुकीस मंजुरी दिली आहे. त्याचवेळी कारवाई सुरू केली आहे.
महामंडळाने संपावर गेलेल्या ३७६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
राज्यातील ४५ गारातील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. राज्य सरकारने जीर काढूनही एसटी कर्मचाऱी संघटनांनी संप मागे घेतला नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.