IND vs AFG 3rd T20I : काल बुधवारी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-20 सामना खूपच रोमांचक झाला. सुरुवातीपासूनच या सामन्यात चढ-उतार होते. रोहित शर्माच्या नाबाद 121 धावा आणि रिंकू सिंगच्या नाबाद 69 धावांच्या बळावर भारताने निर्धारित 20 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 212 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 212 धावा करू शकला. सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी 16-16 धावा केल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताच्या 11 धावांच्या प्रत्युत्तरात अफगाणिस्तानला एक धाव करता आली आणि भारताने सामना जिंकला.
टीम इंडियाने 22 धावांत 4 विकेट गमावून 200 चा टप्पा पार केला. रोहित शर्माने बऱ्याच कालावधीनंतर टी-20 मध्ये मोठी खेळी खेळली. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी आश्चर्यकारक फलंदाजी केली. प्रचंड धावसंख्या उभारूनही टीम इंडिया प्रत्येक चौकार वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसली.अशी अनेक रंजक वळणे या सामन्यात पाहायला मिळाली. या क्रमात विराट कोहलीचा एक अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळाला. त्याने दमदार क्षेत्ररक्षण करत आपल्या संघाच्या 4 धावा वाचवल्या.
Excellent effort near the ropes!
How’s that for a save from Virat Kohli 👌👌
Follow the Match ▶️ https://t.co/oJkETwOHlL#TeamIndia | #INDvAFG | @imVkohli | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/0AdFb1pnL4
— BCCI (@BCCI) January 17, 2024
विराटचे अप्रतिम क्षेत्ररक्षण…
अफगाणिस्तानला 20 चेंडूत 48 धावांची गरज असताना वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर करीम जनातने दमदार शॉट मारला. हा चेंडू सीमारेषेबाहेर जाताना स्पष्ट दिसत होता. पण सीमारेषेवर उभ्या असलेल्या विराट कोहलीने अशी उडी मारली की त्याने चेंडूला 6 धावांवर जाण्यापासून रोखले.
येथे अफगाणिस्तानच्या फलंदाजांना केवळ दोन धावा करता आल्या. विराटचा हा प्रयत्न असा होता की संपूर्ण स्टेडियममध्ये त्यासाठी टाळ्यांचा कडकडाट झाला. या फिल्डिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. विराटने हा षटकार वाचवला नसता तर कदाचित सामना सुपर ओव्हरमध्ये गेला नसता आणि टीम इंडिया आधीच हरली असती असे चाहते लिहित आहेत.
या सामन्यात विराटने एक लांब धाव घेत शानदार झेलही घेतला. असे अनेक प्रयत्न भारतीय संघाकडून क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. कदाचित या प्रयत्नांमुळेच टीम इंडिया सामना बरोबरीत आणू शकला आणि नंतर विजयाची नोंद करू शकला.