पुणे – ग्रामीण भागात करोनाची रूग्णसंख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे. पूर्ववत झालेले व्यवहार, वाढणारी गर्दी, लोकांचा बेफिकीरपणा, मास्क न लावणे, सोशल डिस्टंन्सिगच पालन न करणे ही मुख्य कारणे आहेत.
तपासणीची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाचा प्रसार आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाल्याने रूग्णसंख्या वाढत आहे. करोनाचा प्रसार वाढत असतानाच आता करोनाची भीतीही नागरिकांमधून कमी होत आहे. त्यामुळे लोक जास्त बेफिकीर झाले आहेत.
मला काय होतंय असे म्हणत नागरिक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. असे न करता नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अन्यथा करोना घरात आल्याशिवाय राहणार नाही.