मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहे. भाजपने या प्रकरणी मुंबई, पुण्यासह विविध शहरांत आंदोलन करून आव्हाड यांच्या विरोधात नारेबाजी केली. देशासह राज्यभरातून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. अशात खासदार श्रीकांत शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका
श्रीकांत शिंदे म्हणाले,’जितेंद्र आव्हाड वारंवार हिंदू देव-देवतांचा अपमान करतात. त्यांना त्याची सवय झाली आहे. याचं महत्त्वाचं कारण ते ज्या मतदारसंघातून येतात त्या मतांसाठी असं राजकारण करणं आवश्यक आहे. पण जितेंद्र आव्हाड इतक्या खालच्या पातळीला जातील असं वाटलं नव्हतं. असं म्हणत शिंदे टीका केली आहे.
ते पुढे म्हणाले,’जितेंद्र आव्हाडांना पीएचडी वगैरेही मिळाली आहे. ते खूप विद्वान आहेत. मला वाटतं त्यांनी हिंदू देवदेवतांवर न बोलता औरंगजेब, अल्लाउद्दीन खिलजी, अफझल खान यांनी काय केलं ते काय खात होते याचं प्रवचन मुंब्र्यात जाऊन दिलं पाहिजे. हिंदूंच्या देवदेवतांविषयी बोलण्यापेक्षा ही प्रवचनं करावीत असा खोचक सल्लाही शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांना दिला आहे.