मुंबई – ‘शोले’ चित्रपटातील अभिनेते सतींदर कुमार खोसला अर्थात बिरबल यांचे मंगळवारी सायंकाळी एका खासगी रुग्णालयात वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून सुरू असल्याचे सांगितले जात आहे. हिंदीबरोबरच मराठी, गुजराती, भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. विनोदी भूमिकेसाठी ते खासकरून ओळखले जायचे. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. आज 13 सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार केले जाणार आहेत.
बिरबल यांचा जीवनप्रवास-
सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशननेट्वीट करून बिरबल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पंजाबमधील गुरुदासपूर येथे जन्मलेल्यासतींदर यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1938 रोजी झाला. अष्टपैलू अभिनेता प्रामुख्याने कॉमिक पात्रांसाठी ओळखला जात असे. त्यांचे रंगमंचाचे नाव बिरबल होते त्यामुळे लोक त्यांना याच नावाने हाक मारत असतं. ‘चार्ली चॅप्लिन’, ‘बूंद जो बन गई मोती’, ‘शोले’ यांसारख्या अनेक चित्रपटातून त्यांनी आपले अभिनय कौशल्य दाखवून दिले. त्यांच्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंगसाठी ते ओळखले जात होते.
सतींदर यांनी 1966 मध्ये ‘दो बंधन’ आणि 1967 मध्ये ‘उपकार’ यांसारख्या चित्रपटातून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. यानंतर व्ही. शांताराम यांच्या ‘बूंद जो बन गई मोती’ या चित्रपटातून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. बिरबल यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. आजही सतींदर यांना ‘शोले’ चित्रपटासाठी आठवले जाते.
‘तपस्या’, ‘मेरा गांव मेरा देश’, ‘चार्ली चॅप्लिन’, ‘अनुरोध’, ‘अमिर गरीब’, ‘सदमा’, ‘हम हैं राही प्यार के’, ‘जुगारी’, ‘फिर कभी’, ‘मिस्टर अँड मिसेस खिलाडी’ इत्यादी त्यांचे काही खास चित्रपट होते. ते शेवटचे 2022 मध्ये ’10 नहीं 40′ चित्रपटात दिसले होते. सतींदर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत मनोज कुमार, राजेश खन्ना, जितेंद्र, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, मुमताज यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.