नवी दिल्ली- ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात केरळमध्ये धर्मांतर करून दहशतवादाच्या आगीत फेकल्या गेलेल्या मुलींची कहाणी मार्मिक पद्धतीने मांडण्यात आली आहे.ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. काहींनी हा चित्रपट प्रपोगंडा असल्याची टीका सोशल मिडीयाद्वारे केली आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी थेट चॅलेंज दिले आहे. या चित्रपटातून केल्या जाणाऱ्या दाव्यांचे पुरावे द्या आणि एक कोटी रुपये बक्षीस मिळवा असं आव्हान थरूर यांनी दिल आहे.
केरला स्टोरी हा चित्रपट सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काँग्रेसकडून तर या चित्रपटाच्या ट्रेलरवर वारंवार टीका होताना दिसत आहे. शशी थरूर यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये थरूर म्हणतात,”केरळमधील 32,000 महिलांच्या कथित धर्मांतराचा प्रचार करणाऱ्यांसाठी हा दावा सिद्ध करण्याची आणि पैसे कमावण्याची ही संधी आहे. ते आव्हान स्वीकारण्यास तयार होतील कि त्यांच्याकडे पुरावे नाहीत,मुळात पुरावे अस्तित्वातच नाही?” यासह थरूर यांनी एक फोटो शेअर केला आहे.
थरूर यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ‘केरळमधील 32,000 महिलांनी इस्लाम स्वीकारला, हा दावा सिद्ध करणारे पुरावे सादर करा आणि एक कोटी रुपये जिंका’ असं चॅलेंज देण्यात आलं आहे. शिवाय यासंबंधीचे पुरावे 4 मे रोजी केरळच्या कोणत्याही जिल्ह्यातील काऊंटरवर सादर करू शकता असं म्हंटल आहे. यासोबतच थरूर यांनी ‘नॉट अ केरळ स्टोरी’ हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
Now there’s an opportunity for all those hyping the alleged conversions of 32,000 women on Kerala to Islamism — to prove their case and make some money. Will they be up to the challenge or is there simply no proof because none exists? #NotOurKeralaStory pic.twitter.com/SrwaMx556H
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) May 1, 2023
काय आहे केरला स्टोरीमध्ये नेमकं
मुलींचे धर्मांतर त्याभोवती फिरणारे राजकरण तसेच त्यात अडकलेल्या मुलीची व्यथा तसेच तिच्या कुटुंबाला सहन करावा लागणार त्रास हे सर्व केरला स्टोरीमधून उलगडणार आहे. केरला स्टोरीमधून लापता झालेल्या 32 हजार महिलांबाबतची कहाणी सर्वांसमोर येणार आहे.हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले आहे. विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात अदा शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.