Rahul Gandhi – राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ शेजारच्या अरुणाचल प्रदेशातील रात्रीच्या मुक्कामानंतर पुन्हा आसामात दाखल झाली आहे. ही यात्रा बिस्वनाथ जिल्ह्यातील राजगढ मार्गे आसाममध्ये दाखल झाली आणि राज्याच्या मध्यवर्ती भागातील नागाव जिल्ह्याकडे ती रवाना झाली.
गुरुवार ते शनिवार दुपारपर्यंत ही यात्रा आसामात होती तेथून ती अरूणाचलात गेली होती. आता त्याचा आसामातील दुसरा टप्पा सुरू झाला असून २५ मार्चपर्यंत आसामात यात्रा सुमारे ८३३ किमीचा प्रवास करेल.
आसामात कॉंग्रेसची येथील पंधरा राजकीय पक्षांबरोबर एक आघाडी आहे. त्या आघाडीतील नेते आणि कार्यकर्तेही या यात्रेत सहभागी झाले आहेत. यात्रेचा आज रात्रीचा मुक्काम रूपाही येथील ओवाना गावात आहे. उद्या ही यात्रा कालियाबोरकडे रवाना होणार आहे.