मुंबई – ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता सतीश कौशिक यांचं नुकतंच निधन झालं. कौशिक यांच्या जाण्यानं संपूर्ण बॉलिवूडमधून हळहळ व्यक्त केली जात असताना त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. गुरुवारी रात्री कौशिक यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बोलीववूडमधील सर्व दिग्गज कलाकार मंडळी उपस्थित होती. आता त्यांच्या मृत्यूबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
सतीश कौशिक यांचा खरंच घातपातान मृत्यू झाला का याचा तपास सध्या सुरु आहे. अशात कौशिक यांच्या मॅनेजरने त्या रात्री नेमकं काय घडलं याची माहिती पोलिसांना दिल्याचे समजते. कौशिक हे गुरुवारी दिल्लीमध्ये होते. याआधी तब्बल पंधरा दिवस ते कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत होते. यावेळी त्यांचा मॅनेजर संतोष राय त्यांच्यासोबत होता.
संतोष यांनी सांगितलं की,दिल्लीमध्ये सगळं काही ठीक होत. “नेहमीप्रमाणे रात्रीच जेवण झाल्यानंतर कौशिक हे त्यांचं काही काम करत होते. रात्री अचानक बारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी मला आवाज द्यायला सुरुवात केली. मी त्यांच्याकडे गेलो असता त्यांना प्रचंड ऍसिडिटी झाली होती. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांनी मला डॉक्टरला बोलवायला सांगितल्याची माहिती मॅनेजरने दिली.
त्यानंतर सतीश कौशिक यांना दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची तब्येत देखील खालावलेली असल्यामुळे कुटुंबियांना देखील याबाबत माहिती दिल्याचे मॅनेजरने सांगितले. उपचारादरम्यान बोलताना कौशिक म्हणाले,”मला वाचवा, मला मरायचं नाहीय.. मला मुलीसाठी जगायचं आहे”. तसेच कुटुंबीयांची काळजी घ्या असंही ते यावेळी म्हणाले असल्याची माहिती मॅनेजर रॉय यांनी दिली.