सातारा – कर्करोगाच्या निदान आणि उपचारांच्या तंत्रज्ञानाने गेल्या 20 वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. शरीराच्या कोणत्याही भागाचा आणि आकाराचा कर्करोग पेट सिटी-स्कॅन तंत्रज्ञानाद्वारे शोधला जाऊ शकतो. ज्यामुळे लवकर निदान होण्यास मदत होते. रेडिएशन थेरपी आता निरोगी ऊतींना इजा न करता कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी जवळजवळ 99 टक्के अचूक बनली आहे. टोमोथेरपी-विथ आर्टीफिशीअल इंटेलिजन्ट हे रेडिएशनमधील सध्याचे सर्वात प्रगत तंत्रज्ञान आहे जे तळेगाव येथील ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये उपलब्ध आहे. तंत्रज्ञानातील या प्रगतीमुळे आतापर्यंत लाखो कर्करोग रुग्णांना मदत झाली आहे. अनेक केमोथेरपीची औषधे आलेली आहेत जी पूर्वीपेक्षा जास्त प्रभावी आणि कमी दुष्परिणामांसह उपलब्ध आहेत. मात्र, यामध्ये कॅन्सरबाबत जनजागृती आवश्यक असून वेळेवर निदान होण्याची गरज ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक सचिन देशमुख यांनी व्यक्त केली.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, कॅन्सर, गेल्या 40 वर्षांपासून जगभरात वाढणारा आजार आहे. अनेक वर्षांच्या संशोधनानंतरही शास्त्रज्ञांना कर्करोगाचे मूळ कारण शोधण्यात यश आलेले नाही. तंबाखूचे सेवन, आहाराच्या चुकीच्या सवयी, आनुवांशिकता, मद्यपान, संक्रमण, प्रदूषण, तणाव, लठ्ठपणा आणि शारीरिक निष्क्रियता अशा विविध कारणांमुळे कर्करोग होतो. गेल्या दशकात अनेक संशोधन आणि अभ्यास होऊन देखील कर्करोगाचे वाढते प्रमाण कमी करण्यात यश आलेले नाही. 2022 मध्ये भारतात 16 लाखांहून अधिक कर्करोगाची प्रकरणे आढळली. तज्ज्ञांनी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात आत्तापर्यंत नऊ पैकी एका व्यक्तीला कर्करोग होण्याची शक्यता आहे. 2030 सालापर्यंत प्रत्येक तिसर्या व्यक्तीपैकी एका व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात कर्करोग होण्याची शक्यता आहे. येत्या काही वर्षात सर्वच देशांमध्ये कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये अशीच वाढ दिसून येत आहे.
भारतातील दुसरी मोठी समस्या म्हणजे लोक, खूप लोकांचे ऐकतात. एकदा का कॅन्सरचा रुग्ण आढळला की, 100 लोक 100 वेगवेगळी मते देतात, जरी त्यांना पूर्ण माहिती नसली तरीही. यामुळे बर्याच वेळा रुग्ण अजाणतेपणे त्याला सर्वोत्तम, योग्य असलेला निर्णय घेत नाही. अनेक रुग्ण आयुर्वेद किंवा होमिओपॅथीसारख्या पर्यायी उपचार पद्धतींचाही विचार करतात की ते आजार बरे होतील. अनेक रूग्ण आहेत जे महिनोन महिने आयुर्वेदिक उपचार घेत होते आणि जेव्हा त्यांना ते उपचार लागू झाले नाहीत तेव्हा ते पुन्हा आमच्याकडे आले. पण तेव्हा त्यांचा आजार, अजून पुढच्या अॅॅडव्हान्स स्टेजला पोहोचला होता. बरेच लोक कर्करोग टाळू शकत नाहीत परंतु बरेच लोक, कर्करोगाविषयी जनजागृती करून या आजारावर उपलब्ध असणारी प्रगत उपचार तंत्रज्ञान पद्धती बद्दलची माहिती इतरांना देऊ शकतात जेणेकरून, कर्करुग्ण यातून प्रभावी पणे उपचार घेऊ शकेल.
कॅन्सरबद्दल खूपच कमी जागरूकता
भारतातील सामान्य लोकांमध्ये कॅन्सरबद्दल जागरूकता खूपच कमी आहे. किंबहुना भारतातील बर्याचा डॉक्टरांमध्येही कॅन्सरबद्दल जागरुकता आणि माहितीचा अभाव दिसून येतो. कारण सामान्य लोकांना कर्करोगाची चिन्हे आणि लक्षणे तसेच वेळीच उपाययोजना करण्याचे महत्त्व माहित नाही. अनेकदा डॉक्टर देखील सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोगाचे निदान करण्यात अपयशी ठरतात आणि यामुळे कर्करोगाचे निदान आणि उपचारांना उशीर होतो. उपचाराला उशीर झाल्याने उपचाराच्या परिणामांवर त्याचा परिणाम होतो.
योग्य उपचारांचाही गरज
चांगल्या दर्जाचे निदान आणि उपचार मिळणे ही देखील भारतातील आणखी एक मोठी समस्या आहे. अशी अनेक मोठी रुग्णालये आहेत जिथे लोकांना दर्जेदार उपचार मिळतील असा समज आहे पण प्रत्यक्षात मात्र तसे नाही. काही रुग्णालयांमध्ये ते हाताळू शकतील त्यापेक्षाही अधिक रुग्ण असतात. ज्यामुळे रुग्णाला मिळणार्या दर्जेदार सुविधांवर त्याचा परिणाम होतो. सर्वोत्तम उपचार मिळविण्यासाठी रुग्णाला अचूक निदान आणि योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कर्करोगाने पिडीत अनेक रुग्णांना पाहून आपल्याला वेदना होतात, परंतु योग्य उपचार न मिळाल्याने त्यांना हा कायमचा त्रास सहन करावा लागतो.