मुंबई -‘सर्वज्ञानी..नगरच्या आगीचं खापर पण केंद्रावर फोडताहेत..वेंटीलिटर नव्हे तर राऊत यांची मानसिकताच निकृष्ट बनत चाललीय… आगीत होरपळलेल्यांची चिंता संजय राऊतांना नाहीये उलट राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांची मर्जी सांभाळावी लागतेय…उदय शेट्टी आणि मजनू मध्ये त्यांचा #घुंगरू_सेठ झालाय’ असं म्हणत अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात आग दुर्घटनेवरून भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर जहरी टीका केली आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून प्रतिक्रिया देताना दोन्ही सराकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘फक्त अश्रू ढाळू नका तर ठोस पावले काय उचलणार ते सांगा असा प्रश्न राउत यांनी दोन्ही सरकारला केला आहे’, असं मत मांडलं होत आता त्यांचा याच टीकेवर चित्रा वाघ यांनी ट्विट करत आपलं मत मांडलं आहे.
काय आहे चित्र वाघ यांचं ट्विट
सर्वज्ञानी..नगरच्या आगीचं खापर पण केंद्रावर फोडताहेत..वेंटीलिटर नव्हे तर राऊत यांची मानसिकताच निकृष्ट बनत चाललीय…
आगीत होरपळलेल्यांची चिंता संजय राऊतांना नाहीये उलट राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांची मर्जी सांभाळावी लागतेय…उदय शेट्टी आणि मजनू मध्ये त्यांचा #घुंगरू_सेठ झालाय
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 9, 2021