शिक्रापूर, (वार्ताहर) -पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इंग्रजी व बुद्धीमत्ता या विषयामध्ये अभ्यास क्रमाच्या बाहेरील प्रश्न टाकण्यात आलेले असल्याने पाचवीच्या शिष्यवृत्तीतील इंग्रजी व बुद्धीमत्ता विषयाचे पेपर पुन्हा नव्याने घ्या, अशी मागणी माहिती सेवा समितीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप बेंडभर यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तसेच शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदन देत केली आहे. परीक्षा परत न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
परीक्षेमध्ये इंग्रजी व बुद्धीमत्ता या विषयाचे पेपर मुलांच्या अभ्यासक्रमा बाहेरील काढण्यात आल्याचे दिसून आले, तर मुलांच्या वयोगटाचा विचार करता हे प्रश्न त्यांच्या बुद्धीगुणांना प्रमाणित नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण होऊन विद्यार्थी तसेच पालक आणि शिक्षक वर्गात अन्याय झाला. मुलांच्या वयोगट आणि बुद्धीगुणांचा विचार करुन मुलांचे नैराश्य दूर करण्यासाठी पाचवीच्या शिष्यवृत्तीतील इंग्रजी व बुद्धीमत्ता दोन्ही विषयाचे पेपर पुन्हा नव्याने घेण्यात यावेत, असे बेंडभर यांनी म्हटले आहे.