टोकियो -भारताच्या महिला हॉकी संघाला बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चमकदार कामगिरी करूनही अर्जेंटिनाकडून 2-1 असा निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. अर्थात या पराभवानंतरही भारताच्या महिला हॉकी संघाची ग्रेट ब्रिटनशी ब्रॉंझपदकाचा सामना खेळत यंदाच्या स्पर्धेत पदकाची निश्चिती करण्याची संधी कायम आहे.
उपांत्य फेरीत महिला संघाचा पराभव जरी झाला असला तरी संपूर्ण भारत देश त्यांच्या आतापर्यंत खेळाचं कौतुक करत आहे. याचदरम्यान, भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू वंदना कटारियाच्या कुटुंबाने गंभीर आरोप केले आहेत.
त्यांचा कुटुबांने पत्रकरांशी बोलतांना सांगितले, उपांत्य फेरीच्या सामन्यात चमकदार कामगिरी करूनही अर्जेंटिनाकडून 2-1 असा निसटत्या पराभवाचा सामना करावा यानंतर महिला हॉकी संघाचा वंदना कटारिया यांचा घरासमोर काही अज्ञातांनी फटाके फोडले आणि वंदनाच्या कुटुंबीयांना जातीवाचक शिव्या दिल्याचा आरोप केला आहे. ते परिसरात दहशत निर्माण करीत होते तसेच असे देखील म्हणाले कि, ‘दलित खेळाडू असल्यामुळे संघ हरला’ असेही वंदनाच्या कुटुंबाने पत्रकारांना सांगितले आहे.
या घटनेची सविस्तर बाब वंदनाच्या कुटूंबियांनी पोलिसांना देखील सांगितले असून पोलीस या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहे. वंदनाच्या कुटुंबीयांनी युवकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जर आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेला नाही तर आम्ही आत्महत्या करु असे कुटुंबियांनी म्हटले आहे.