महाळुंगे इंगळे -तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्याकडेला खराबवाडी, महाळुंगे, खालुंब्रे या ग्रामपंचायतींच्या हद्दीत जी अतिक्रमणे करण्यात आली आहेत ती रविवार (दि. 8) पासून काढली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्याकडून पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे काढली जाणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांनी दिली.
रस्त्याचे काम करण्यासाठी वेळोवेळी सूचना करूनही अतिक्रमणे काढण्याची तसदी नागरिक घेत नसल्याने आता स्वतः सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस संरक्षण घेऊन उर्वरित अतिक्रमण काढणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे. रस्त्याच्या कडेची अतिक्रमणे काढण्याच्या अगोदर शासनाच्या वहिवाटीतील रस्त्याच्या हद्दीत करण्याचे काम सुरु झाले आहे. यातून नक्कीच वाहतूक कोंडीचा 20/30 टक्के वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे.
काही नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन शासन जागेवरील अतिक्रम केलेली जागा रिकाम्या करून दिल्या आहेत. पण काही नागरिकांनी काय होत नाही, या अविर्भावात राहून अतिक्रमने तशीच ठेवली आहेत त्यांच्या बांधकामावर रविवारी हातोडा पडणार आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.