मंचर / पारगाव शिंगवे -नागापूर (ता. आंबेगाव) येथील श्रीक्षेत्र थापलिंग यात्रेनिमित्त घाटात तब्बल आठ वर्षानंतर गेल्या दोन दिवसात सुमारे 450 बैलगाडे धावले, अशी माहिती थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली. थापलिंग यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतींची जुनी परंपरा आजही टिकून आहे.
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे भाविक केवळ श्रद्धेपोटी बैलगाडे घाटात पळवितात. येथील यात्रेत बैलगाड्यांना कुठल्याही प्रकारचे इनाम बक्षिसे दिली जात नाही. थापलिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने घाट व परिसराचे काम केले आहे.
घाटाच्या दोन्ही बाजूच्या कठड्यांची उंची वाढवली आहे, तसेच शर्यतीनंतर बैल थांबावेत, यासाठी आळे तयार केले आहे. बैलगाडा मालक व शौकिनांचे स्वागत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम आणि सरपंच गणेश यादव यांनी केले.