राजगुरूनगर – खेड तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. रविवार, सोमवार सलग दोन दिवस पावसाचा शिडकावा झाला. तर, गुरुवारी (दि. 15) पुन्हा ढगाळ वातावर होते. परिणामी वातावरणात उकाडा जाणवला.
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, काही ठिकाणी नुसतेच ढगाळ वातावरण होते. खेड तालुक्यातही तुरळक पावाने हजेरी लावली होती. तर ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवू लागला असून रात्रीच्या वेळी पुन्हा पंखे लावण्याची वेळ आली आहे.
यंदा डिसेंबर महिन्यात किमान 9 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा खाली घसरला होता. थंडी, पावसाची हजेरी. त्यानंतर जाणवरा उकाडा यामुळे डिसेंबर महिन्यात पाऊस, थंडी आणि उकाडा असे वातावरण नागरिकांनी अनुभवले आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराईचा प्रादूर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसा खर्च करून औषध फवारणी करावी लाग आहे.