मुंबई – बॉलिवूडचा खिलाडी कुमार आपल्या अभिनयासोबतच स्पष्ट वक्तेपणासाठी देखील प्रसिद्ध आहे. नुकतंच अक्षयचा सेल्फी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यावेळी अक्षयने एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलखात दिली यावेळी अक्षयने आपल्या आयुष्यात केलेल्या काही चुकांबाबत देखील भाष्य केले. तसेच आपल्या वयक्तिक आयुष्याबाबत देखील अक्षयने अनेक खुलासे यानिमित्ताने केल्याचे पाहायला मिळाले.
तुमच्या आयुष्यात कधी तुम्ही अशी चूक केली आहे का ? जी तुम्ही आता सांगू शकाल असा थेट सवाल यावेळी अक्षयला विचारण्यात आला. यावर बोलताना अक्षयने थोडा वेळ विचार केला आणि तो म्हणाला,हो माझ्याकडून चूक झाली आहे. पान मसाल्या सारख्या गोष्टींची जाहिरात करणे ही माझी चूक होती असं स्पष्टमत यावेळी अभिनेत्याने व्यक्त केलं.
या आधी देखील मी ही जाहिरात केल्याची चूक मान्य केली असल्याचे अक्षयने यावेळी सांगितले. तसेच मला माझी चूक लक्षात आल्यानंतर रात्रभर झोप आली नव्हती त्यानंतर मी ती कबुल केल्याचे देखील अक्षयने यावेळी सांगितले.
— Akshay Kumar (@akshaykumar) April 20, 2022
यानंतर अक्षयने सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट देखील शेअर केली आहे.अक्षयने चाहत्यांशी शेअर केलेल्या माफीनाम्यात लिहिले की, मला अनेक ऑफर्स येतात. मला अनेक मोठ्या गुटखा कंपन्यांकडून जाहिरात करण्यासाठी ऑफर मिळतात आणि त्या अगणित रक्कम द्यायला तयार आहे. पण हे त्याच्याबद्दल नाही, मी हे काम निरोगी भारतासाठी करणार नाही, मी चुकीच्या गोष्टी करणार नाही.असं अक्षय यावेळी म्हणाला.