भारत-बांगलादेश वाटाघाटी
नवी दिल्ली, दि. 6 – भारत-बांगलादेश संबंध अधिक दृढ करण्यासाठी उभय देशांच्या प्रतिनिधींची बोलणी सुरू झाली. बांगलादेश अध्यक्षांचे खास प्रतिनिधी अब्दुल सत्तार व भारताचे प्रतिनिधी जी. पार्थसारथी यांच्या दरम्यान आज दोन तासांहून जास्त वेळ महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी भारताचे बांगलादेशमधील उच्चायुक्त दास उपस्थित होते. 15 ऑगस्टनंतर बांगलादेशात घडलेल्या घटनांचा विचार प्रामुख्याने आजच्या चर्चेत झाल्याचे कळते.
खास संदेश
बांगलादेशाचे अध्यक्ष सायेम यांनी पंतप्रधान गांधींना एक “खास’ संदेश पाठविला असून तो सत्तार यांनी इंदिराजींना दिला.
कलावंतांच्या संख्येत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक
बंगलोर – देशात कलावंतांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो, असे ललित कला अकादमीच्या मतदारांच्या ताज्या यादीवरून दिसते. पहिला क्रमांक दिल्लीचा लागतो, तर महाराष्ट्रात 124 आहेत. त्या खालोखाल पश्चिम बंगालचा क्रमांक आहे तेथे 101 कलावंत आहेत.
गांधीजींच्या कल्पनेतील आदर्श खेडे “पुपाखेडा’
रतलाम – महात्मा गांधीजींच्या कल्पनेतील आदर्श खेडे “पुपाखेडा’ येथे साकार झाले आहे. हे खेडे स्वावलंबी असून दारूचा स्पर्शही या खेड्यास नाही. आपापसातील वाद, कायदेकानून या गोष्टी या खेड्यातील लोकांना माहिती नाही.