मुंबई – ‘चिखल…चिखलात लोळण्याचा कार्यक्रम वक्तशीर झाला बर्नार्ड शॉ वाचण्यासाठी दोघांनाही उशीर झाला’ रामदास फुटाणे. यांच्या चिखल या कवितेतील ओळी शेअर करत नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज ट्विट द्वारे सूचक इशारा दिलाय.
चिखल
——–
चिखलात लोळण्याचा
कार्यक्रम वक्तशीर झाला
बर्नार्ड शॉ वाचण्यासाठी
दोघांनाही उशीर झालारामदास फुटाणे
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 11, 2021
दरम्यान, राज्यात रोज आरोपांची चिखलफेक होत आहे. ज्यांनी आरोपांची परंपरा सुरु केली त्यांचीच आता पळताभूई होत आहे. सध्याच्या राजकारणामध्ये कुणीही कोणाकडे बोट दाखवू नये. निवडणुका जिंकण्यासाठी राजकारणाची पातळी खालावली. महाराष्ट्रावर राजकीय चिखलफेकीचा डाग लागत असून भाजपने ही नौटंकी बंद करावी, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षाला खडसाविले होते.
तत्पूर्वी,संजय राऊत म्हणाले होते, राज्यात रोज आरोपांची चिखलफेक होत असून महाराष्ट्रावर राजकीय चिखलफेकीचा डाग लागत आहे. या संदर्भात महत्वाच्या व्यक्तीने लक्ष घेऊन हे थांबवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच राज्याची चिंता असलेले मुख्यमंत्री किंवा राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे यामध्ये पुढाकार घेऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.