खजुराहो – कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरताना गांधींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचं कौतुक केलं होत. त्यांच्या या विधानावरून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी निराजी व्यक्त केली आहे. तसेच राजकीय नेत्यांनीही या वादग्रस्त विधानावरून संताप व्यक्त केला गेला.
यानंतर मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील बगेश्वरी धाम येथून पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अटक कालीचरण महाराजला करण्यात आली. छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये कालीचरण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई झाली.
या अटकेवरून भाजपाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय पत्रकरांशी बोलतांना काँग्रेस नेते राहुल गांधींवर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले,’संतांनीही आपल्या भाषेच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. संतांबाबत कोणत्याही सरकारमध्ये सॉफ्ट कॉर्नर असणे गरजेचे आहे. कालीचरण महाराजांच्या अटकेबाबत विजयवर्गीय म्हणाले की, ‘ राहुल गांधी तुकडे तुकडे गैंगची पाठ थोपटतात आणि ते इन्शाअल्लाह, इंशाअल्लाह अशा घोषणा देणाऱ्यांचे कौतुक करतात. असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.
दरम्यान, छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘धर्म संसदे’मध्ये धर्मगुरु कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून धर्माचे अनुयायी आणि महामंडलेश्वर आले होते.