– सीए संतोष घारे
जगभरातील विमान उद्योग 2023 मध्ये ङ्गिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेताना दिसून आला आहे. विमान उद्योगाचा गतवर्षीचा एकूण नङ्गा 23.3 अब्ज डॉलर्स इतका आहे. पर्यटन वाढल्यामुळे विमान कंपन्यांचे उत्पन्न वाढले आहे.
जगभरातील विमान कंपन्यांनी सलग तीन वर्षे प्रचंड नुकसान सहन करत आता या हवाई उद्योगाने नङ्गा कमावण्यास सुरुवात केली आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने म्हटले, की विमान उद्योग 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 23.3 अब्ज डॉलरचा नङ्गा कमवू शकतात. गेल्यावर्षी विमान उद्योगाला 3.8 अब्ज डॉलरचा ङ्गटका बसला आणि तो अंदाजापेक्षा अधिक होता. डिसेंबर 2022 मध्ये विमान उद्योगाच्या आर्थिक उन्नतीबाबत मत मांडताना आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने 2023 पासून ङ्गारशा अपेक्षा नसल्याचे म्हटले होते. उद्योगाला नाममात्र ङ्गायदा होईल, असे भाकित केले होते. त्यावेळी 4.7 अब्ज डॉलरच्या ङ्गायद्याचा अंदाज वर्तविला होता. पण विमान उद्योगाने आश्चर्यकारकपणे उत्पन्नात वाढ केली. यादरम्यान, ‘आयएटीए’चे संचालक विली वॉल्श यांनी विमान कंपन्यांच्या संयमाचे कौतुक केले.
वॉल्श म्हणतात, या लाभाचे प्रत्यक्ष रूपाने आकलन करण्याची गरज आहे. वसुली प्रभावशाली आहे, मात्र 2.7 टक्क्यांचे नफ्याचे मार्जिन हे कोणत्याही उद्योगातील गुंतवणूकदारांसाठी अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. विमान कंपन्यांना प्रत्येक प्रवाशांमागे केवळ 5.45 डॉलर राहत असून यावरून नङ्गा किती कमी आहे, याचा अभ्यास करायला हवा. एवढ्या पैशात तर आपण लंडनच्या एका स्टारबक्समध्ये कॉङ्गीचा एक मोठा कप घेऊ शकता. इतका कमी ङ्गायदा हा एखाद्या कंपनीचे भवितव्य घडविण्यासाठी पुरेसा नाही आणि अशा स्थितीत तो तगही धरू शकणार नाही. पुढच्या वर्षी विमान उद्योगाला 964 अब्ज डॉलरची ऐतिहासिक कमाई होण्याची अपेक्षा असून ही कमाई सुमारे 24 अब्ज डॉलरचा ङ्गायदा मिळवून देणारी आहे. मात्र, हे केवळ सुरुवातीचे अंदाज आहे. विमान उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, 2024 मध्ये चार कोटींपेक्षा अधिक उड्डाणे होतील असा कयास आहे.
विमान उद्योगात जगभरात सुमारे 30 लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. 2024 मध्ये प्रवाशांकडून 717 अब्ज डॉलरचा महसूल मिळण्याची शक्यता आहे आणि हे प्रमाण 2019 च्या तुलनेत 18 टक्के अधिक आहे. यामागचे कारण म्हणजे प्रवाशांची वाढणारी संख्या. शिवाय बहुतांश प्रवासी एकापेक्षा अधिक वेळा प्रवास करत आहेत. अर्थात ‘आयएटीए’चे महासंचालक वॉल्शच्या मते, सध्या विमान उद्योगाचा सुगीचा काळ असला तरी वाटतो तेवढा मार्ग सोपा नाही. ते म्हणतात, विमान कंपन्यांत प्रवाशांवरून स्पर्धा सुरू राहील. याशिवाय देशांदेशातील कडक नियम, पुरवठा साखळीतील अडचणी आणि वाढता खर्च हे देखील ओझे आहेच. रशिया युक्रेन युद्ध, इस्रायल-हमास संघर्ष देखील आहेच.
यादरम्यान, भारतीय पर्यटक उद्योगाची भरभराट होत आहे. भारतीय नागरिक हे प्रामुख्याने ईशान्य देशांचा प्रवास करत असून चीनमधील मंदीची भरपाई करण्याचे काम करत आहेत. भारतीय पर्यटकांकडून कमाई होण्याची अपेक्षा थायलंड, श्रीलंका, मलेशियासारख्या देशांना असून त्यांनी भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा ङ्ग्री प्रवेशाची घोषणा केली. आजकाल ईशान्य देश जसे थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. व्हिसा ङ्ग्री प्रवेशाशिवाय इंडिगो आणि थाय एअरवेजसारख्या विमान कंपन्यांनी माङ्गक दरात हॉटेल उपलब्ध करून दिले असून विशेष ऑङ्गरचा देखील मारा केला जात आहे. नवनव्या कंपन्या भारताच्या पर्यटन व्यवसायात आपला सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत.
विमान उद्योगातील तज्ज्ञ ब्रॅडन सोबी म्हणतात, ईशान्य आशिया पर्यटनाच्या आघाडीवर विकासाला वाव असणारे ठिकाण असून तेथे भारतीय पर्यटकांच्या माध्यमातूनच समृद्धी पोहोचणार आहे. अनेक ईशान्य आशियाई देशांसाठी पर्यटन उद्योग हा अर्थव्यवस्थेच्या प्रमुख आधारस्तंभापैकी एक आहे. ऑर्गनायजेशन ऑङ्ग इकॉनॉमिक कॉर्पोरेशन डेव्हलपमेंट (ओईसीडी)च्या मते, या विमान उद्योगात चार कोटींपेक्षा अधिक नागरिक काम करत आहेत. गेल्या एक दशकांपर्यंत या उद्योगाला चीनकडून मोठे पाठबळ मिळायचे. चीनचे नागरिक ङ्गिरण्यासाठी ईशान्य देशांकडे जाण्यास उत्सुक असत आणि परिणामी विमान उद्योगांची चांदी व्हायची. मात्र, नंतर चिनी पर्यटकांची संख्या कमीच राहिली आहे. याउलट भारतीय पर्यटकांची संख्या ही दीर्घकाळापर्यंत वाढतच राहिली तर अनेक विमान आणि पर्यटन उद्योगात व्यापक बदल पाहावयास मिळतील. उदाहरणार्थ, विमानाची, उड्डाणांची संख्या वाढेल, हॉटेल आणि टुरिझम ऑपरेटर्स आणखी चांगले ऑङ्गर देतील आणि तसे संकेतही मिळत आहेत.
आशिया विकास बँकेने 2023च्या मे महिन्यात जारी केलेल्या अहवालात म्हटले, की परदेशात जाणार्या पर्यटकांच्या दृष्टीने भारत हा भविष्यातील चीन म्हणून नावारूपास येऊ शकतो; परंतु विमान तळांची अपुरी संख्या हा मोठा अडसर राहू शकतो. पर्यटनात भारत हा आगामी दशकांत सर्व देशांचे लक्ष वेधून घेऊ शकतो. थायलंडमध्ये पर्यटन हा आर्थिक स्रोताचा मोठा भाग आहे. तेथे भारतीय नागरिक नेहमीच ङ्गिरायला जातात. तरीही त्यांची संख्या चिनी पर्यटकांपेक्षा कमीच आहे. टुरिझम अॅथॉरिटी ऑङ्ग थायलंडचे डेप्युटी गव्हर्नर तानेस पेट्सुवान यांनी यावर्षी भारतातून सुमारे 16 लाख प्रवासी येतील अशी आशा व्यक्त केली.
मे महिन्यात चिनी नागरिकांपेक्षा भारतीयांनी सिंगापूरला अधिक पसंती दिली आहे. इंडोनेशियाला जाणार्या भारतीयांची संख्या 63 हजार राहिली तर या काळात तेथे 64 हजार चिनी पर्यटक तेथे दाखल झाले. थाय एअरवेजचे सीईओ चाय एमसीरी म्हणतात, भारतीय हवाई मार्ग हा खूपच सक्षम असून भविष्यात या मार्गाकडून अनेक अपेक्षा आहेत. थाय एअरवेज सध्या दर आठवड्याला चीनमधून 14 उड्डाणे करतो. दुसरीकडे भारतातील उड्डाणांची संख्या 70 वर पोचली आहे. चाय म्हणतात, आगामी दहा वर्षांत भारतातून ये-जा करणार्या विमानांची संख्या ही दुप्पट होऊ शकते.