मंचर, (प्रतिनिधी) – वकिली व्यवसाय करणाऱ्यां वकिलांना नोटरी पदवी बहाल करण्यात आली असून यामध्ये आंबेगाव तालुक्यातील २१ वकिलांची केंद्र सरकारने नोटरीपदी नियुक्ती केली आहे, अशी माहिती आंबेगाव तालुका बार असोसिएशन घोडेगावचे अध्यक्ष अॅड. प्रमोद काळे यांनी दिली .
नोटरी मिळवण्यासाठी वकिली व्यवसायात १० वर्षाचा अनुभव व ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले होते. त्यांच्या ऑनलाइन मुलाखती झाल्या होत्या. त्यानंतर नोटरीची पदवी बहाल करण्यात आली आहे.
वकील हे कायदेशीर व्यावसायिक असून काही कायदेशीर कामे करण्यासाठी अधिकृतपणे स्वाक्षरी पाहणे, शपथ घेणे व कागदपत्रे प्रमाणित करणे व व्यवहारांची वैधता प्रमाणित करण्याचा अधिकार त्यांना आहे. रजिस्टरमध्ये नोंद केलेली नोटरी म्हणजेच रजिस्टर्ड नोटरी समजली जाते. प्रत्येक नोटरीला आलेला दस्त आपल्या रजिस्टरमध्ये नोंद करणे कायदेशीर बंधनकारक आहे.
प्रत्येक नोंद दस्तावर नोंदणी नंबर लिहिणे, आवश्यक ती तिकीटे लावावी लागतात. आंबेगाव तालुक्यात अॅड. विलास शेटे, सुदाम मोरडे, आशिष काजळे, नवनाथ निघोट, प्रमोद काळे, दीपक विलास लोहटे, ज्योती खेसे-गुंजाळ, वैशाली बांगर, वर्षा थोरात, प्रशांत मंडलिक, श्रीकांत काळे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, नयना पडवळ, लक्ष्मण डामसे, अमित बेल्हवरे, विनोद चासकर, अनिता पोखरकर, राजश्री चासकर, चेतन उदावंत व ज्योती गणेश शिंदे-भगत,दीपक लायगुडे यांचा समावेश आहे.
दाखल्यांसाठी होणार सोयीचे…
ग्रामीण भागात विविध प्रमाण पत्र व दाखले प्रमाणित करण्यासाठी नोटरी वकिलांची गरज असते. सध्यस्थितीत नोटरीधारक वकिलांची संख्या फारच कमी होती. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात नोटरीधारक नियुक्त्या केल्यामुळे नागरिक, विद्यार्थी व व्यावसायिकांना सोय होणार असल्याचे आंबेगाव तालुका बार असोसिएशन घोडेगावचे अध्यक्ष अॅड. प्रमोद काळे यांनी सांगितले.