संगमनेर, (प्रतिनिधी) – संविधान बदल्याचे किती ही आरोप झाले तरी आम्ही असेपर्यंत संविधान बदलण्याची कोणाचीही हिंमत नाही. विरोधक हे संविधान बदलणार, असा अप्रचार करून लक्ष्य विचलित करत आहे मात्र, २०२४ ला नरेंद्र मोदीचं पुन्हा पंतप्रधान होणार अन् हा पठ्ठ्या पुन्हा मंत्री होणार, अशी वल्गना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली .
संगमनेर येथील बस स्थानकासमोरील मैदानात घेण्यात आलेल्या सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळ्याप्रसंगी मंत्री आठवले बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री अविनाश महातेकर , रिपाइं प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , सुनिल मोरे. दीपक गायकवाड , प्रकाश लोढे , युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे ,सुनिल साळवे ,
तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार , युवक तालुकाध्यक्ष योगेंश मुन्तोंडे , कैलास शेजवळ , अनिल ननवरे , सुभाष त्रिभुवन, बाबा पंडीत , संदिप मगर ,रमेंश शिरकांडे , विजय खरात , बापू रणशूर , गणेश साळवे , रमेश भोसले , विजय कदम , सुधाकर कदम , बाळासाहेब कदम आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला , तरुण वर्ग उपस्थित होता.
आठवले म्हणाले की , संगमनेर शहर हे ऐतिहासिक शहर असून मला येण्यास उशिर झाला असताना सुद्धा संगमनेरकरांनी मोठया उत्साहात माझे स्वागत केले, या प्रेमापोटी मी भारावून गेलो. उदया मी जर शिर्डीतून उमेदवारी केली नाही तरी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहिल. मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात सबका साथ सबका विकास धरर्तीवर लोकांकरिता कल्याणकारी योजना राबविल्या जात आहे.
या सर्वांगीण विकासामुळेचं २०२४ ला पुन्हा नरेंद्र मोदी हे देशांचे पंतप्रधान होतील व हा पठ्ठया पुन्हा मंत्री होईल, अशी घोषणा आठवले यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मताचा मी असून इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला ही आरक्षण मिळाले पाहिजे, असे आठवले म्हणाले .
यावेळी अविनाश महातेकर म्हणाले की, रिपाइंला शिर्डीसह सोलापूर या दोन जागा मिळाल्या पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. शिर्डीतून रामदास आठवले हेचं उमेदवारी करतील, असे सांगितले. यावेळी संगमनेर शहरात प्रथमचं आलेल्या प्रख्यात गायिका कडूबाई खरात यांच्या गाण्यावर तरुणांईसह सर्वांनी ठेका धरल्याचे दिसून आले. प्रास्ताविक श्रीकांत भालेराव, आशिष शेळके यांनी केले .