Narendra Modi । लोक कसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. अशात सत्तेत असलेल्या भाजपने पहिली उमेदवार यादी जाहीर केली. भाजपकडून 195 उमेदवाराच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजप पक्षातील हायप्रोफाईल नेत्यांसह कलाकारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप ४०० पार जाणार असल्याचा दावा मोदींनी केला आहे. अशात भाजप जर निवडणूक जिंकली तर २०२६ मध्ये हा देश कर्जात डुबलेला असेल’ अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
लोकसभा निवणुकीत भाजपाकडून सध्या ४०० पारच्या घोषणा दिल्या जात आहे. पण त्यांना ४०० पार करायचं की नाही? हे मतदारांनी ठरवायचं आहे. त्यांच्याकडून मोठं मोठे आश्वासनं दिली जातील, आणि घोषणा दिल्या जातील. मात्र तुम्ही मतदार आहात. मतदार जे ठरवतील तेच होणार आहे असं आंबेडकर यांनी म्हटल.
ते पुढे म्हणाले,’मात्र मागच्या दहा वर्षात बेरोजगारी वाढली त्याची हमी दिली जाते आहे. मनोज जरांगेंना आरक्षण देतो असं सांगण्यात आलं. मात्र ते इथून निराशा घेऊन गेले. हे सरकार फसवणुकीची हमी देतं आहे मोदी सरकारच्या कारभारामुळे प्रत्येकाच्या डोक्यावरचं कर्ज वाढलं आहे. जर १० हजार एका व्यक्तीचा पगार असेल आणि बँकेला हप्ता म्हणून १० हजार रुपये द्यावे लागत असतील तर त्या व्यक्तीकडे शिल्लक काय रक्कम राहणार ? मग माणूस घर-दार विकायला काढतो. मोदी आणि आरएसएसला परत निवडून दिलं तर २०२६ मध्ये हा देश कर्जात डुबलेला असेल. जगण्यासाठी दारुडा जसा भांडी विकतो, फर्निचर विकतो आणि मग शेवटी घर विकतो आणि रस्त्यावर येतो. भाजपाकडे सत्ता गेली तर अशीच वेळ येऊ शकते. माझं भाजपाला आव्हान आहे मी खोटं बोलत असेल तर मला खोडून दाखवा.’असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.